Breaking News

खऱ्या आदिवासींचा भव्य मोर्चा ! -६ एप्रिल २०१६

!!! खऱ्या आदिवासींचा भव्य मोर्चा !!!
-----६ एप्रिल २०१६-----मुंबई आझाद मैदान🚩वेळ -सकाळी १० वाजता
सर्व आदिवासी जमातीतील माता भगिनी बांधव यांना सविनय जय आदिवासी...🏻सर्व समाजकार्यकर्त्यांना विंनती करण्यात येत आहे की आझाद मैदान आंदोलनाची तयारी जवळजवळ पुर्ण होत आलेली आहे.तरीही अजुन अपेक्षित जाहीरात होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित...
१)प्रत्येकाने आपआपल्या गावात /शहरात/ विभागात,मिटींगा आयोजित कराव्यात(सांयकाळी किंवा वेळेनुसार)आंदोलनाचे महत्व पटवुन देवुन ६ तारखेला सुट्टी टाकुन सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.२)निधीची आवश्यकता असल्याने प्रत्येकाने आपआपले आर्थिक योगदान देवुन इतरांकडुन निधी संकलीत करावा ही विनंती.३)आपआपल्या विभागात स्वत:चे सौजन्य टाकुन दर्शनी जागी आंदोलनात सहभागी होण्यासाठी ४*६ चे banner स्वखर्चाने लावुन जाहीरात करावी.४)बॅनरवर आदिवासी क्रांतिकारक महानायक यांच्या प्रतिमा असाव्यात. जेणे करून एकात्मतेची भावना समाजात रुजेल .५)आपआपल्या भागातुन जे आंदोलक येनार आहेत त्यांची list तयार करुन स्वत:जवळ ठेवावी.तसेच मोर्चाचा खिश्याला लावायचा बिल्ला(कागदी)तयार करुन निघताना आंदोलकांना वाटावा जेनेकरुन प्रवासात अडचन येनार नाही६)आपआपल्या ग्रुपवरती लक्श ठेवुन आंदोलनात सुसुञता व शांतता ठेवन्यास मदत करावी.७) आझाद मैदान परीसरात आल्यावर स्वय:सेवकांना मदत करावी जेणेकरुन गडबडगोंधळ होनार नाही.८)आपआपल्या घरी,नातेवाईकांत जास्तितजास्त जाहीरात करुन हे आंदोलन जास्तितजास्त लोकांचं होईल याबाबत काळजी घ्यावी.९) हे आंदोलन सर्व सामाजीक संघटनांनी आयोजीत केलं आहे येथे कोणत्याही पक्शाचा संबध नाही ह्याची जाणीब येनार्यानी असु द्यावी.१०)आदिवासी समाजाच्या प्रत्येक घटकाने सरकारला दाखवुन द्यायचं आहे की आम्ही सुध्दा संघटीत आहोत त्यासाठी आम्हाला आंदोलनादरम्यान शिस्तबध्दता राखावी लागेल.११)सहभागी संघटनांनी येताना आपआपले दोन कोरे letterhead आणुन जमा करावे (टेबलला)जेणेकरुन निवेदन(मुख्यमंञी व मुख्यसचिव) यांना वेगवेगळ्या संघटनांची निवेदने bulk मध्ये देता येतील व दबाव वाढेल,सुसुञता येईल.१२) हे आंदोलन राज्यस्तरीय आहे किनवट,पालघर सारखे हे पन भव्यच झाले पाहीजे तरच सरकारवर आमचा दबाब पडेल व आदिवासींची दखल घेतली जाईल म्हणुन आम्हाला पुर्ण ताकतीने हे आंदोलन यशस्वी करायचे आहे हे ध्यानात असावे.१३)हे आंदोलन आपण सर्वच जन करत आहोत त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने व ताकतीनेच हे पुर्णत्वाला न्यायचे आहे ह्याची जानीव असु द्यावी.१४)ऊन्हाचा सिझन असल्यामुळे डोक्यावर टोप्या,टॉवेल वगैरे असावे ह्याबाबत काळजी घ्यावी ही विंनती
हे आंदोलन म्हणजे आदिवासींच्या अस्मितेचा,अस्तित्वाचा,संघटन क्षमतेचा व मुलभुत अधिकारांचा प्रश्न आहे म्हणुन प्रत्येकाने जोरदारपने प्रयत्न करुन आदिवासींची ताकत दाखवावी.
वैयक्तिक नावासाठी,मानपानासाठी कृपया अडुन राहु नये ही विनंती.आयोजक आपण सगळेच आहोत ह्याची जाणीव असु द्यावी.
जय सेवा,जोहार,जय बिरसा,जय आदिवासी,जय राघोजी,आपकी जय हो.
 आयोजक  
||आदिवासी संघर्ष कृती समिती||

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti